जे जे उत्तम

नंदन नी सुरु केलेला "जे जे उत्तम" चा टॅग, प्रथम विद्या आणि मग प्रिया कडुन मला मिळालेला.
खरं म्हणजे, मधे सानिया यांचं "स्थलांतर" वाचत होतो, तेव्हा वाचता-वाचता एखादा पॅरा आवडला, तर तो इथे टाकु असं वाटलेलं. पण आळशीपणा केला.
anyway, जे झालं, ते झालं.
सध्या जे वाचत आहे, त्यातला मला आवडलेला एक पॅरा खाली मांडत आहे.

-----

या उपक्रमाबद्दल नंदनचीच प्रस्तावना:

पुस्तक वाचताना, अनेकदा काही परिच्छेद आवडतात. संपूर्ण पुस्तकाचा विचार केला तर ते कदाचित तितके महत्त्वाचे नसतीलही; पण त्या त्या वेळेला ते आवडून जातात. असेच काही आवडलेले उतारे, कुठल्याही भाष्याशिवाय देण्याचा हा एक उपक्रम.

-----

"सुमेधसोबत कधीपासुन काम करत आहेस?" ताईंनी विचारलं.
"रेग्युलर असं या प्रकल्पपासुनच. म्हणजे अशातच. पण गेल्या काही वर्षांपासुन जात होते ’प्रगत’ मधे अधुनमधुन. सुमेध आणि मी एकाच कॉलनीत राहतो." मी घाईघाईनं माहिती पुरवली.
"या प्रकल्पाचा अहवाल तूच लिहिते आहेस क?"
"हो. परवा दिल्लीला एक सेमिनारही अटेंड केलं याच विषयावरचं."
"अरे वा. बरंच लवकर तुला सेमिनारला वगैरे पाठवलं की सुमेधनं. वर्ष झालं का तुला जॉइन होऊन?"
"नाही अजुन."
"फारसं कुणी टिकत नाही ’प्रगत’ मध्ये." त्या अंदाज घेत बोलल्या.
"हो. असं ऐकलंय मीही." मी शांतपणे म्हणाले.
"तुझा काय विचार आहे?"
"काहीच नाही."
"म्हणजे?"

"म्हणजे असं, की विचार वगैरे करुन काही विषेश होत नसतं असं वाटतंय मला आजकाल. उगीच खूप काही पुढचे अंदाज बांधत बसायचे, असं झालं तर असं करु म्हणुन प्लॅनिंग करयचं, त्यासाठी काहीतरी तजविजी करायच्या, पूर्वतयारी म्हणुन चक्क काही तडजोडीही आधीच करायच्या... आणि मग ते तसं काही झालं नाही किंवा भलतंच काही झालं की आपण खल्लास. त्यापेक्षा जेव्हा जशी वेळ येईल तेव्हा तसे निर्णय घ्यायचे. कृती करायची. हे उत्तम. काही वाईट होत नाही विचार न केल्यानी, झालं तर चांगलंच होतं... असं वाटतंय.
एक गोष्ट ऐकली होती मी एका किड्याची..
एका किड्याला शंभर पाय होते. तो आपला चालला होता नेहमीप्रमाणं आपलं अन्न मिळवायला. रस्त्यात त्याला एक विचारवंत भेटला. किड्याला पाहुन तो थांबला. त्याने किड्याला नवलानं विचारलं, ’मी चार पायांचे, सहा-आठ-बारा पायांचे किडे पाहिले आहेत. ते कसे चालतात तेही पाहिलं आहे. पण तुला तर शंभर पाय आहेत चक्क. या शंभर पायांनी तु चालतोस कसा?"
किडा म्हणाला, ’ते तर मलाही नाही माहित. विचार करुन सांगतो.’
विचारवंत निघुन गेला.
किडा विचार करु लागला. बराच वेळ विचार केल्यावरही त्याला उत्तर काही सापडलं नाही. आणि मग एकदम त्याच्या लक्षात आलं की, आपण चालायचेच थांबलो आहोत. असेच थांबुन राहिलो, तर अन्न कसं मिळेल?
मग किड्यानी विचार करायचं थांबवलं आणि चालायला सुरुवात केली."

पुस्तक: ब्र
लेखिका: कविता महाजन

-----

कुणाला ’खो’ देऊ आता? कुणी अजुन ह्यात सहभागी झालं नाहीये? नक्की माहित नाही, तरी पण -

जास्वंदी
संवादिनी
स्नेहा
विभा
सर्किट

आणि ज्यांचा ’खो’ मी इतक्या उशिरा घेतला - विद्या आणि प्रिया - kindly forgive me for my procrastination & laziness. :)

7 comments:

प्रिया said...

हे पुस्तक खूप दिवसांपासून वाचायचंय.... हा उतारा वाचून परत आठवण झाली. Good choice :)

सर्किट said...

saheeeeeeeeeeeeeee...

eka vadhadiwasala lata didinchi ToI ne mulakhat ghetali hoti. nehemipramane english prashnanna hindit uttare, ha type.
kahitari philosophical prashn vicharala, tar didi hasun mhanalya, "maine zindagi me kabhi itana zyada nahin socha. loag to soch soch ke booDhe ho jaate hain."

te athavala. :)

Raj said...

yaa pustakaache Nandan che samikShaN vaachalyaapasUnach pustak vachayachi utsukataa aahe. aata ti dviguNit jhalI aahe. chhaan utaaraa!

Anand Sarolkar said...

Good choice! Pustakabaddal utsukta vadhli ahe ata :)

मोरपीस said...

खूप छान

Monsieur K said...

@Priya,
Thanks! tu 'kho' dilaa mhanun-ch ithe lihitaa aala. hey pustak nakki vaach - khup-ch chhaan aahe.

@Circuit,
i vaguely remembered this answer of Lata didi. ekdam simple, aani ekdam mast :)
btw, tulaa 'kho' dilaa aahe, tar tu pan lihi lavkar. ;-)

@Raj,
mi Nandan cha book review recently vaachlaa. do read the book - it makes a good read.

@Anand,
as i am telling e'one, do read it, if u havent.

@Morpees,
thanks :)

Vibha said...

khup divas zalele hey pustak vachun..
chhhan vatatlaa haa paragraph